Thursday 22 March 2018

शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे....


शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे....
त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला...
उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे... पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”... भारतातली एक मोठी बाजारपेठ होती...
राजाभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला...
रायगड ते बुऱ्हाणपूर हे १००० किमी पेक्षा जास्त अंतर आहे परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले...
आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली..


शिवाजी महाराजनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे...

छत्रपती शिवाजी महाराज साहेबांनी स्वराज्यात होणार्या आक्रमणामुळे होणारी तुट आणि नुकसान भरून काढण्यासाठी वेळोवेळी मुघल आणि आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती.
इ.स.१६६४ पासून शिवाजी महाराज साहेबांनी शत्रूंचे मुलुख लुटण्यास प्रारंभ केला .शिवाजी महाराज साहेबांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे
१. सुरत दोनदा (१६६४,१६७०)
२.बारिसाल ((१६६४)
३.बऱ्हाणपूर तीन वेळा (१६७०,१६७५,१६७९ )
४.कारंजा (१६७०)
५.बेतीगिरी,भागन गर,कुकली,वेरुड( १६७५)
६.कारवार (१६७७)
७.श्रीरंगपट्टण (१६७७)
८.हुबळी व आसपासचा प्रदेश (१६७७-७८) -महाराज साहेबांचे सरदार दत्ताजी पंडित यांनी आक्रमण करून लुटलेला प्रदेश.
९.नासिक-त्र्यंब क(१६७७-७८)
१०.अथणी व संगम (१६७७-७८)
११.धरणगाव(१६७५)
१२.चोपडे व धरणगाव(१६७९)
१३.औरंगाबाद (१६७९)
१४.कल्याण-भिवंडी येथून भूमिगत द्रव्य

छत्रपती शिवरायांनी जेव्हा पहिल्यांदा सुरतेवर स्वारी केली तेव्हाचे काही आवर्जून मांडावेत असे वृत्तांत.

* शिवरायांच्या या सुरत स्वारीत एवढी गुप्तता होती कि सुरतेच्या फक्त २ मैल अलीकडे जेव्हा मराठ्यांचे सैन्य येऊन ठेपले तेव्हा इनायतखान सुभेदारास या गोष्टीविषयी माहिती मिळाली.
* शिवाजी राजे जेव्हा गणदेवीला असताना, 'शिवाजी राजे आपले नाव सांगत नसून आपण बादशाही सरदार आहोत व अहमदाबादकडे जात आहोत एवढेच सांगत होते.
* सर्व शहराबद्दल हाजी सैद बेग आणि वीरजी व्होरा या दोघांना ताब्यात घेण्यास शिवाजी राजे तयार होते - डच वृत्तांत 
* पोर्तुगीज दप्तर म्हणते - मराठ्यांनी आधी आणून ठेवलेल्या जहाजातून माल चढवून तो पाठवून देण्यात आला.
* कुणी पाठलाग करू नये म्हणून चारशे - पाचशे मावळ्यांची एक फळी मागील बाजूस संरक्षणासाठी ठेवली होती. 
* १० जानेवारी रोजी महाराजांनी सुरत येथेच्छ मारून काढता पाय घेतला तर १७ जानेवारीला बादशहाचे सैन्य सुरत रक्षणासाठी येऊन दाखल झाले. 
* सुरत लुटीने बादशहा हतबल बनला. व्यापाऱ्यातील व रयतेतील मराठ्यांबद्दलची भीती दूर करण्यासाठी त्याला काही प्रभावी उपयोजना कराव्या लागल्या त्या अश्या

i) व्यापाऱ्यांना वर्षभर जकात माफ करणे 
ii) सुरत शहराला भक्कम तट बांधणे (जो १६६९ रोजी पूर्वी पूर्ण झाला) 
iii) मराठ्यांचा बंदोबस्त करणे (जे आयुष्यात कधीच साधता आले नाही :D :D ) 
* इंग्रज फॅक्टरी रेकॉर्ड च्या पत्रात लोकांनी शिवाजींचे शरीर हवामय असून त्यांना पंखही आहेत असे उठविले होते. राजांना भीमाचे सामर्थ्य आहे असेहि लोक मानत.



शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...