Wednesday 21 March 2018

मिरवणुकीसाठी हत्ती लागतील याचा विचार छ.शिवरायांनी आधीच करून ठेवला होता....

मिरवणुकीसाठी हत्ती लागतील याचा विचार छ.शिवरायांनी आधीच करून ठेवला होता.छ.शिवरायांच्या सैन्यात हत्तींचा वापर होत नसे.हत्तीचा वापर केवळ शोभेसाठी होत होता.त्याकाळी रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा मार्ग अतिशय अरुंद होता जेथून माणसालासुद्धा चालणे फार अवघड होते.जर त्या रस्त्यावरून कुणी खाली पडले तर त्याचे प्रेतसुद्धा मिळणे अशक्य होते इतकी खोल दरी तेथे होती. अशा अरुंद रस्त्यावरून एवढे अवाढव्य हत्ती कसे काय रायगडावर पोहोचले हे त्याकाळच्या इंग्रज अधिकाऱ्याला (जो राज्याभिषेकासाठी हजार होता) कळलेच नाही.नंतर फार जास्त विचारपूस केल्यावर कळले की छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या १८ वर्षे अगोदरच दोन हत्तीचे पिल्ले (एक नर एक मादा )कर्नाटक वरून उन्हाळ्याच्या काळात बोलाविले होते.त्यांना छ.शिवरायांचा एक माणूस रोज हिरवा चारा द्यायचा.तेथील वाळलेला चारा खायची त्या हत्तींना सवय लागू दिली नाही.नंतर काही दिवसांनी हाच माणूस हिरवा चारा त्याच्या डोक्यावर घेऊन फिरायचा आणि ते हत्ती भूकेपोटी त्या चाऱ्याच्या मागे फिरायचे.थकल्यावर त्यांना तो चारा मिळायचा.एक दिवस त्या माणसाने तो हिरवा चारा डोक्यावर घेऊन रायगडाच्या अरुंद पायवाटेने चालायला सुरुवात केली.ते दोनीही हत्ती चारयाकडे बघत बघत त्याच अरुंद पायवाटेवरून चालू लागले.त्यांचे लक्ष केवळ त्या चारयाकडे होते.खाली असलेली जीवघेणी खोल दरी त्यांना दिसून चक्कर येऊन त्यांचा खाली पडण्याचा प्रश्नच तेव्हा उरला नव्हता.असे आपल्या अन्नाकडे बघत बघत ते दोनीही हत्तीचे पिल्ले रायगडावर पोहोचले.त्याच दोन हत्तींचे प्रजनन होऊन जे हत्ती पुढे जन्मले त्यापैकी काही मरण पावले आणि फक्त चार उरले त्याच हत्तींवर छ.शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली होती.एवढा दूरदृष्टीकोन ठेवणारे आपले छ.शिवाजी महाराज खरोखर महान होते.
संदर्भ - शिवमुद्रा

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...