Tuesday 20 March 2018

शिवाजी महाराज यांच्या सावलीत बसणं म्हणजे32 मन सोन्या च्या सिहासन बसण्या सारखे आहे,राजे संभाजी महाराज

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील मानला वेदना देणारे क्षण.......
आज काहीतरी लिहिताना खूप #वेदना होत आहेत. #दुःख होत आहे. आणि फार #वाईट देखील वाटत आहे. कारण #लेखक #रणजित #देसाई यांचे #छत्रपती #शिवाजी #महाराजांवर लिखित #श्रीमानयोगी हे #पुस्तक जेव्हा  पहिल्यांदा माझ्या वाचनात आले होते तेव्हा आपल्या शिवाजी महाराजांवर #अन्ना मधून हळूहळू रोज थोड्या थोडया प्रमाणात सौम्य #विषप्रयोग केले गेले होते. हि #गोष्ट वाचून तेव्हा फार दुःख झाले होते, वेदना झाल्या होत्या. आणि त्यांच्यावर अन्नाच्या माध्यमातून विषप्रयोग करणाऱ्या लोकांचा देखील मला भरपूर राग आणि संताप आला होता.रणजित देसाई यांनी श्रीमानयोगी मधून महाराजांच्या जीवनातील हा कटू प्रसंग ज्या शब्दात मांडला आहे ते वाचताना खरच डोळ्यात #पाणी जमा होते. पुढील पान वाचण्यासाठी मन धजावते. शिवाजी महाराजांचे ते होणारे #हाल, त्यांना होणाऱ्या #व्यथा, #वेदना नाही वाचायला होत. आणि आज तोच श्रीमानयोगी मध्ये वाचलेला प्रसंग #झी #मराठी वरील #स्वराज्यरक्षक #संभाजी या मालिकेच्या माध्यमातून पाहताना हृदयाला फार वेदना झाल्या. खूप वाईट वाटले.
        अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी #मुघल #बादशाह औरंगजेबाने काळ्या विद्येचा देखील वापर केला होता. तो #औरंगजेब देखील अखेर हतबलच झाला होता. त्यात त्याला शेवट पर्यंत काही #यश आले नव्हते. महाराजांवर औरंगजेबकडून #काळी #विद्या करू पाहणार जो #मांत्रिक होता तो औरंगजेबाला बोलला होता स्वतःची #जान प्यारी असेल तर या सीवा वर काळी विद्या करण्याचा नाद सोड. काळ्या विद्येच्या माध्यमातून आपण सीवा चा बाल पण बाका करू शकत नाही कारण त्याचा जो कोणी #गुरु आहे अथवा तो ज्या कोणाला याद फर्मावतो; त्याचा तो देव, खुदा,भगवंत खूप मोठा आहे. शक्तिशाली आहे. ताकदवर आहे. तो आपल्याला या गोष्टीत कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मी काही करू शकत नाही आणि मला माझी जान देखील प्यारी आहे. मी यापुढे या मार्गाच्या माध्यमातून कधीच शिवाच्या मार्गाला जाणार नाही. तेव्हा तू पण माझ्या नंतर दुसऱ्या कोणाकडून असा काही प्रकार करण्याचा विचार देखील करू नकोस आपल्याने ते होणार नाही. शिवा कोणी तरी मोठा फरिश्ता आहे असे वाटते. त्याच्यापुढे आपण या अश्या काळ्या विद्येच्या मार्गाने कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. हि गोष्ट अखेर कुठे तरी जाऊन पाटल्या नंतर तेव्हा कुठे जाऊन औरंगजेबाने शिवाजी महाराजांवर स्वतःकडून केला जाणार काळ्या विद्येचा प्रयोग करण्याचा विचार थांबवला होता. आणि त्यामुळे असे देखील बोलले जाते की त्यामुळे औरंगजेब हा आपल्या शिवाजी महाराजांना थोडा दचकूनच होता. म्हणून महाराजांच्या उभ्या हयातीत तो स्वतः कधी दक्षिण भारतावर चाल करून आला नाही. तो स्वतः आला ते थेट संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाल्या नंतर. परंतु शिवाजी महाराज या भूतलावर असे पर्यंत औरंगजेब नामक या दानवाने कधीच दक्षिण भारतकडे मान वर करून पाहिले नाही. या मागे त्या मांत्रिकाने दिलेला सल्ला आणि त्याचा औरंगजेबाने घेतलेला धसका हे देखील या मागील अनेक इतर कारणां मधील एक कारण होते असे समजले जाते.
        हा एक वेगळा भाग झाला परंतु काळ्या विद्येसारख्या तमाचारी मार्गाच्या मदतीने औरंगजेबाला जे जमले नाही ते महाराजांच्या घरातील कुटुंबातील एका खूप जवळच्या व्यक्तीने आपल्या अतिमत्वकांक्षेच्या वृतीला बळी जात करून दाखवले. जर महाराजांवर जेवणाच्या माध्यमातून असे सौम्य विषप्रयोग केले गेले नसते तर खरंच महाराजांना आणखी काही वर्षांचे आयुष्य लाभले असते. अवघ्या ५२ व्या वर्षी महाराजांनी आपला देह सोडला.रयतेचा वाली, जानता राजा युद्धभूमीवर नाही तर रायगडावरील आपल्या महालातील भीछायतीवर शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेता झाला.
        कधी कधी मनात एक विचार येतो जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबा एवढे आयुष्य लाभले असते तर??? आज आपल्याला आपल्या भारत देशाचा एक वेगळा इतिहास वाचायला मिळाला असता. परंतु तसे होऊ शकले नाही. त्याला कारण इतकेच जे कोणी परका दुश्मन करू शकला नाही ते घरातील कुटुंबामधील खूप जवळचा व्यक्ती करू शकला. नाहीतर त्या काळी काय कोणाची मजाल होती शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का लावण्याची.
        आजचा स्वराज्यरक्षक संभाजीचा भाग पाहताना नाय पाहवले गेले महाराष्ट्राच्या नृसिंहाला भीछाण्यावरती असे खूप वेदनेने विव्हळताना. मनात सारखे वाटत होते कि अरे आज ज्या व्यक्तीमुळे आपण आपल्याच भूमीत सहीसलामत राहिलो. आपले आडनाव हिंदू असून पण आपण धर्माने पण हिंदूच राहिलो. अरे ज्या आपल्या राजाने  आपल्या समाजातील लोकांचे भविष्य ओळखून आपला वर्तमान सतत आपल्या लोकांचे एक सुवर्ण भविष्य असावे या साठी विविध युद्धांनमध्ये, मोहिमांमध्ये व्यस्त राहून नेहमी संघर्षयुक्त असाच ठेवला आणि खूप मोठा असा महापराक्रमी असा इतिहास संपूर्ण जगासमोर ठेवला. त्या आपल्या जाणत्या राजाचा मृत्यू केवळ आणि केवळ त्याला अन्नतून रोज थोडे थोडे सौम्य विष दिले जात होते या एका कारणामुळे झाला हे कारणच मनाला खूप वेदना देणारे आहे. हा विषय सर्वांसमोर मांडण्याची हिंमत आजवर खूप कमी लेखकांनी तसेच शिवाजी महाराजांवर चित्रपट आणि मालिका निर्माण करणाऱ्या निर्मात्यांनी केली. त्या सर्वांना खरच माझा मनाचा मुजरा.
         स्वराज्यरक्षक संभाजी पाहताना एक गोष्ट नेहमी जाणवत राहते ज्या गोष्टी आजपर्यंत खूप स्पष्टपणे पुढे आल्या नव्हत्या त्या स्पष्टपणे पुढे आणण्याचे काम हि मालिका करत आहे. मालिकेवरून कोणता वाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर हि काही बंधने असू शकतात असतीलही आणि म्हणूनच त्या बांधनामध्ये राहूनच त्यांना मुख्यकरून महाराजांची पत्नी सोयराबाई आणि सुरवणीस अण्णाजी दत्तो अश्या कित्येकांचे  व्यक्तिमत्व एका चौकडीच्या पलीकडे न जाता दाखवावे लागत आहेत.परंतु हि दोन व्यक्तिमत्व जर खऱ्या अर्थाने तुम्हाला समजून घ्यायची असतील तर तुम्हाला त्या साठी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती विविध सुप्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचावी लागतील. आणि ती एकदा का तुम्ही वाचली तर तुम्हाला कळून चुकेल कि या दोन व्यक्तिरेखा काय आणि कुठल्या पातळीच्या होत्या ते. तुम्हाला त्यांचा संताप आल्या शिवाय राहणार नाही. राहता राहिला प्रश्न आपल्या शिवाजी महाराजांवर विषप्रयोग कोणी केला याचा. मालिकेच्या माध्यमातून पुढे काय दाखवले जाते हे आपण पाहूच पण खऱ्या अर्थाने जर आपणास या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर प्रसिद्ध लेखकांकडून लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकां मध्ये दडून बसलेल्या काही पानांन मध्ये मिळेल. इतकेच बोलून मी आपली रजा घेतो.
source internet
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शंभूराय

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...