Monday 12 March 2018

औरंगजेबाच्या आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का ???

औरंगजेबाचा वार्षिक महसुल त्या काळा मध्ये ३५० कोटी आहे आणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महसूल कसाबसा एक कोटी आहे. औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या साडे १४ हजार आहे आणी एका सरदाराच्या हाताखालीकमीत कमी ४०००० च सैन्य आहे. तर शिवाजी महाराजांच सैन्य कसंबसं फक्त ३५००० आहे.
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब स्वराज्याला का चिरडायला निघाला.हयात घालवली त्यानी. आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे.
इरान तसंच आहे.
गोवळकोंड्याची कुतूबशाही तशीच आहे.
नगरची निजामशाही तशीच आहे.
विजापुरची आदिलशाही तशीच आहे.
ते घे ना. विजापुर ची आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे. महाराषट्रच का ???
स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं म्हणतात.
तो लिहितो
'इरानच राज्य शाहबाजच आहे.
अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुल आहे.
विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्या निजामशाहाच आहे.
पण शिवाजींच स्वराज्य हे कोणत्य राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य आहे.
आणी जिथ रयतेच राज्य असतं तिथे माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका आहे तो हा.'
औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या यशसवितेच गणित मांडल.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं.
आणी हे खरंच आहे. तो बुंदेलखंडाचाछत् ­रसाल बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन महाराजांकडे आला आणीम्हणाला की त्याला महाराजांच्या सौन्यात सामील व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी त्यालासमजवलं की जसं त्यांनी इथे स्वराज्य स्थापन केलं तसं त्यानेबुंदेलखंडत करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वाराज्याचा प्रयोग.


शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...